कल्याणच्या एपीएमसी (APMC) मार्केटमध्ये आज सकाळच्या सुमारास भर बाजारात एक धक्कादायक घटना घडली. २० वर्षीय तरुणाने पती, पत्नी आणि त्यांच्या मुलावर कैचीने हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून, मुलगा गंभीर जखमी झाला आहे, तर पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे. मयत व्यक्तीचे नाव चमनलाल कारला असे आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा कार्तिक सध्या कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव चिराग सोनी असून बाजारपेठ पोलिसांनी त्याला अवघ्या काही तासांत ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे तर जखमी पत्नी आणि त्यांचा मुलगा रुग्णालयात उपचार घेत आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चमनलाल कारला आणि चिराग सोनी हे दोघेही एपीएमसी (APMC) मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ केळीची पाने विक्री करण्याचा व्यवसाय करतात. काल सकाळी जळगावहून केळीच्या पानांचा माल या मार्केटमध्ये आला. यात एक बंडल चमनलाल यांना जास्त गेले. केळीच्या पानांचे बंडल अदलाबदल झाल्याने चिराग आणि चमनलाल या दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन चिरागने कैचीने चमनलाल यांच्यावर कैसे हल्ला केला यावेळी चमनलाल यांना सोडवण्यासाठी गेलेली त्यांची पत्नी व त्यांच्या मुलावर देखील चिरागने चमनलालवर हल्ला केला.
या हल्ल्यात चमनलाल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय. तर त्यांची पत्नी आणि मुलगा कार्तिक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चिराग याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करत याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, भर दिवसा एपीएमसी मार्केट या गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.