भारतीय शेअर बाजारात (Market) मोठा बदल झाला आहे. बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना सतत काळजी लागून असते की परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे FII मार्केटमध्ये विक्रीचा सपाटा लावतील, जे गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळालं. त्यांनी विक्री सुरू केली तर बाजार पडेल हे निश्चित आहे पण, यावेळी, भारतातील लहान गुंतवणूकदारांनी मोठ्या पैशाच्या परदेशी गुंतवणूकदारांना त्यांची ताकद जाणवून दिली आहे.
याशिवाय असं म्हटलं की आपल्या लोकांनी परकीय पाहुण्यांना त्यांची जागा दाखवून दिली तर वावगं ठरणार नाही. यामागचं कारण असं आहे की भारतात पहिल्यांदाच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (DII) हिस्सा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांपेक्षा (FII) जास्त झाला आहे. होय, 22 वर्षांत प्रथमच NSE वर सूचीबद्ध कंपन्यांमध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा (FPIs) जास्त शेअर्स खरेदी केले आहेत.
भारतीय कंपन्यांवर वाढला विश्वास
म्हणजे आता भारतीय गुंतवणूकदारांचा कंपन्यांवर विश्वास वाढला आहे. तसेच परदेशी गुंतवणूकदार आता भारतीय शेअर बाजारात कमी रस घेत असल्याचंही या बदलावरून असे दिसून येते. शेअर्सच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि कंपनीचे उत्पन्नही मंदावले त्यामुळे, परदेशी गुंतवणूकदार आता भारतातील हिस्सा विकत आहेत.
मार्च तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय शेअर बाजारात DII चा 16.91 टक्के हिस्सा आहे तर, स्वतःला फन्ने खान मानणाऱ्या विदेशी पाहुण्यांकडे 16.84 टक्के हिस्सा आहे. याआधी देशांतर्गत बाजारात असं कधीच घडलं नव्हतं. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी लहान SIP गुंतवणूकदारांच्या पैशांच्या मदतीने बाजी मारली, ज्यामुळे एफआयआयना धक्का बसला. सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर्सची विक्री करणाऱ्या परकीय गुंतवणूकदारांना इच्छा असूनही भारतीय बाजारात फारशी घसरण आणू शकले नाही, ज्याला आपलेच लोक कारणीभूत ठरले.