आयपीएल 2025 नंतर, टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करेल. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधाराबाबत मोठी बातमी आली आहे. जूनच्या अखेरीस सुरू होणाऱ्या इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यावर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) उपकर्णधारपदाची भूमिका दिली जाण्याची शक्यता कमी आहे. या महान वेगवान गोलंदाजाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला एकमेव विजय मिळवून दिला. त्याच्या कर्णधारपदाचेही खूप कौतुक झाले. याशिवाय, भारताने आणखी दोन कसोटी सामने जिंकले होते. आता बुमराहची उपकर्णधारपदाची जागा कोण चालवणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.
बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करता, तो इंग्लंडमध्ये पाचही कसोटी सामने खेळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे निवडकर्ते संपूर्ण दौरा खेळू शकेल अशा खेळाडूचा शोध घेऊ शकतात. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “आम्हाला असा खेळाडू हवा आहे जो पाचही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल आणि त्याला उपकर्णधाराची भूमिका देण्यात यावी. बुमराह पाचही सामने खेळणार नाही, त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या सामन्यांसाठी वेगवेगळे उपकर्णधार नियुक्त करायचे नाहीत. कर्णधार आणि उपकर्णधार निश्चित झाले आणि त्यांनी पाचही कसोटी सामने खेळले तर बरे होईल.
अहवालानुसार, निवडकर्त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून एका तरुण खेळाडूची आवश्यकता आहे, जो भविष्यातील कर्णधार म्हणून तयार होऊ शकेल. सध्याच्या संघातील फक्त दोनच मुख्य खेळाडू या श्रेणीत बसतात. भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी ही शुभमन गिलला मिळू शकण्याची शक्यता आहे. इतर नियमित खेळाडू विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, तर यशस्वी जयस्वाल 23 वर्षांचा असूनही खूपच तरुण मानला जातो. भारताची इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होईल, तर पाचवी आणि शेवटची कसोटी 31 जुलैपासून सुरू होईल.