मुंबई इंडियन्सच्या संघाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. कारण रविवारी एकाच सामन्यानंतर आता तब्बल तीन संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये (IPL playoff) आता फक्त एकच संघ जाऊ शकतो. पण आता मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना काय करावे लागेल. मुंबई इंडियन्ससाठी नेमकं समीकरण आहे तरी काय, ते आता समोर आले आहे.
आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये आता गुजरात टायन्स, आरसीबी आणि पंजाब किंग्स हे तीन संघ पोहोचले आहेत. पण मुंबईच्या मार्गात प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मोठे अडसर येऊ शकतात. कारण आता तीन संघ तर प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत आणि एकच जाता शिल्लक आहे. मुंबई इंडियन्सचे आता दोन सामने बाकी आहेत. मुंबईचा यामधील पहिला सामना हा दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे, तर दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्सशी खेळवला जाणार आहे. मुंबईला आता एक गोष्ट करावी लागणार आहे. त्यांनी एकाच सामन्यावर एकावेळी लक्ष द्यायला हवं.
मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना हा २१ मे या दिवशी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना मुंबईसाठी सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण मुंबईच्या प्ले ऑफच्य मार्गात दिल्लीच्या संघाचा मोठा अडसर असणार आहे. त्यामुळे या सामन्यात जर मुंबईने दिल्लीच्या संघाला पराभूत केल तर त्यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरू शकते. पण हा सामना जिंकूनही त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येणार नाही.
मुंबई इंडियन्सचा त्यानंतर दुसरा सामना हा लखनौ सुपर जायंट्शी होणार आहे. हा सामना मुंबईसाठी सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला आणि या सामन्यात जर लखनौने मुंबईला पराभूत केले तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यानंतर मुंबईला दिल्लीच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल. त्यामुळे मुंबईला काही करून हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईला फक्त दिल्लीच्या संघाला पराभूत करुन चालणार नाही, तर त्यांना लखनौच्या संघालाही धुळ चारावी लागेल. मुंबईच्या संघाला जर थेट प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यासाठी त्यांना दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल, एकही सामना त्यांना गमावून चालणार नाही.
मुंबई इंडियन्सला आता मोठा धक्का बसला आहे. कारण एकाच सामन्यानंतर तीन संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईच्या संघाला जर प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यासाठी त्यांना दोन्ही सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे.