आंब्याचा हंगाम म्हणजे फळप्रेमींसाठी पर्वणी! पण योग्य प्रकारे काढणी न झाल्यास आंब्याची गुणवत्ता घसरू शकते आणि बाजारभावही कमी मिळतो. त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहोत आंबा काढणीचे १० सुवर्णनियम, जे तुम्हाला उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत करतील.
आंबा काढणीची योग्य वेळ :
कोकणात मार्च-मे तर उर्वरित महाराष्ट्रात मे-ऑगस्ट हा हंगाम असतो. योग्य वेळी काढणी केल्यास आंब्याची चव व टिकवण क्षमता वाढते.
८५-९०% पक्वतेनंतरच काढणी करा :
फळ झेल्याच्या सहाय्याने देठासह काढावे, जेणेकरून नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत होईल आणि टिकवण क्षमताही वाढेल.
देठ ४-६ सें.मी. ठेवा – फळांवरील डाग टाळा :
लहानसा देठ ठेवल्याने चिक बाहेर पडत नाही आणि आंब्यावर काळे डाग येत नाहीत.
सकाळी किंवा संध्याकाळीच काढणी करा :
उन्हामुळे तापमान वाढल्यास फळांतील साखरेचे प्रमाण बदलते, त्यामुळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच काढणी करा.
काढणी नंतर सावलीतच ठेवा :
थेट उन्हात ठेवल्यास फळांची आर्द्रता कमी होऊन गुणवत्तेत घट येते.
रोगट, पक्षांनी खाल्लेली फळे वेगळी ठेवा :
अशा फळांचा बाजारात योग्य दर मिळत नाही आणि निर्यातीतही अडथळे येतात.
फळांचे तापमान ३०°C पेक्षा जास्त होऊ देऊ नका :
उष्णतेमुळे आंब्याचे पोषणमूल्य कमी होते, त्यामुळे योग्य साठवणूक आवश्यक आहे.
वाहतूक रात्रीच्या वेळेस करा – दर्जा टिकवा :
भर उन्हात वाहतूक केल्यास फळांचा दर्जा खालावतो, म्हणून रात्रीच वाहतूक करा.
फळांना नैसर्गिक चमक द्या – बाजारभाव वाढवा :
काढणीनंतर फळांची चमक टिकून राहील याची काळजी घ्या, यामुळे आंब्यांना जास्त मागणी मिळते.
पोटॅशियम मेटाबायसल्फाईट उपचार – टिकाऊपणा वाढवा :
०.०५% द्रावणात १० मिनिटे बुडविल्यास फळांवरील बुरशीजन्य संसर्ग कमी होतो.