आशासेविकांचे १६ जूनपासून आंदोलन

वर्षभरापूर्वी आशा तसेच आरोग्यसेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ४५ दिवस आझाद मैदानावर आंदोलन केले होते. या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र आजही त्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आशासेविका त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी १६ जूनपासून आंदोलन करणार आहेत.

आशासेविकांना (Asha workers) पाच हजार रुपयांची रक्कम लागू करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आझाद मैदान येथे त्यावेळी केली होती. त्याचीही पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. महापालिकेतील आशासेविकांना दर महिन्याच्या एक तारखेस आधीच्या महिन्याचे वेतन देण्यात येईल तसेच इतर मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते.

२९ जुलै २०२४ रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणे, महापालिका आशासेविकांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान वेतन देणे, आशासेविकांचा पगार दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणे, सेवानिवृत्त झालेल्या आरोग्यसेविकांच्या रिक्त जागेवर महापालिकेच्या आशासेविकांना आरोग्यसेविका म्हणून नियुक्त करणे, ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र, स्टेशनरी अप्रॉन देणे, कोणत्याही कामासाठी अतिरिक्त मानधन मिळण्यासंदर्भात निर्णय लादू नये आदी मागण्या करण्यात आल्याचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील कायमस्वरूपी गैरहजर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी’, असे निर्देश मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी दिले. यांनी ‘घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले स्वच्छता कर्मचारी नियमितपणे त्यांची जबाबदारी पार पाडत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. मात्र, ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून एखादा कर्मचारी कायमस्वरूपी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी. सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आदींनी ‘सचेत’ अॅपचा नियमित वापर करावा’, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.