देशासाठी शिखर धवनने उचलले मोठे पाऊल; पाकिस्तानची जगासमोर लाज काढली

सध्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचे सामने सुरु आहेत. ही लीग 18 जुलै 2025 पासून सुरु झाली. आतापर्यंत दोन सामने खेळवले गेले आहेत. आता आजचा सामना हा दोन महत्त्वपूर्ण संघामध्ये रंगणार आहे. आजचा सामना पाकिस्तान आणि भारत यांच्यात रंगणार आहे. हा हायल्हॉटेज सामन्यापूर्वी शिखर धवनने एक निर्णय घेतला ज्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

भारताचा माजी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यातून आपले नाव मागे घेतले आहे. हा सामना रविवारी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. धवनने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सर्व सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागील कारण म्हणून त्याने या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला आहे.

धवनने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले. त्याने म्हटले की मी अजूनही 11 मे रोजी घेतलेल्या निर्णयावर ठाम आहे. धवन म्हणाला, ‘मी अजूनही 11 मे रोजी घेतलेल्या पावलावर ठाम आहे. माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि देशापेक्षा काहीही मोठे नाही.’ धवनने 11 मे रोजी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याने स्पर्धेत भाग घेण्याबद्दल बोलले होते, परंतु पाकिस्तानविरुद्ध कोणताही सामना खेळणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.

धवनने ईमेलमध्ये लिहिले आहे, ‘प्रिय संघ, मला विश्वास आहे की हा ईमेल तुमच्यासाठी चांगला ठरेल. धवन येत्या WCL लीगमध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध कोणत्याही सामन्यात सहभागी होणार नाही याची औपचारिकपणे पुनरावृत्ती आणि पुष्टी करण्यासाठी हे आहे. 11 मे 2025 रोजी कॉल आणि व्हॉट्सअॅपवर झालेल्या आमच्या चर्चेदरम्यान हा निर्णय आधीच देण्यात आला होता.”