अनिलभाऊंसोबत जायला वैभव दादा देखील तयार…

लोकसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्ष करीत असताना आपणास पाहायला मिळत आहेतच. तशातच अनेक मोर्चे बांधणी देखील होत आहेत. अनेक पक्ष आपले मिळावे देखील घेत आहेत. सांगलीत महायुतीचा मेळावा झाला. त्यावेळेस पाटील यांनी आपले मत देखील व्यक्त केले.आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत महायुतीत राहून प्रामाणिकपणे एकत्रितपणे काम केलं पाहिजे.

अजित दादांच्या भूमिकेनुसार महायुतीचे काम आम्ही ताकदीने करणार आहोत यामध्ये कोणतीच शंका नाही त्यासाठी आम्ही मतभेद बाजूला ठेवून लोकसभेपर्यंत तरी अनिल भाऊंसोबत देखील जायला आम्ही तयार आहोत अशी महत्वपूर्ण भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव दादा पाटील यांनी दर्शवली आहे.

ही भूमिका त्यांनी सांगली येथील महायुतीच्या मेळाव्यात घेतली आहे. मोदी साहेबांच्या स्वच्छता अभियानामुळेच विट्याचे नाव देशात पोहोचले आहे. असे गौरवास्पद शब्द वैभव दादा पाटील यांनी काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक देखील केलेले आहे.