काळम्मावाडी धरणाची गळती, थेट पाईपलाईनचे लिकेज ..

कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात आहे परंतु या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यंदा पाऊस कमी असल्याने मुळातच धरणात पाणी कमी आहे.

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, पाईपलाईनमधून किती पुरवठा होणार आणि भोगावती नदीतून किती सोडण्यात येणार याबाबत कसलेही नियोजन नसल्याने पाणी किती आणि कसे वापरले जाणार याबाबत संभ्रम आहे. पाईपलाईनची गळती आणि पूर्ण क्षमतेने होणारा प्रवाह यासाठी पुढील दोन वर्षांत शेतीसाठी आणि नागरिकांनाही पाणी जपून वापरावे लागणार आहे. अशातच काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना हेही महत्त्वाचे कारण ठरणार आहे.काळम्मावाडी घरण उभारणीपासूनच गळतीचा प्रश्न कायम राहिला आहे. धरणाच्या मुख्य भिंतीतून होणारी गळतीसाठी कोट्यावधींचा निधी दिला परंतु अद्याप कसलेच काम सुरू नसल्याने ही गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश आले नाही. गतवर्षीपासून पाणी साठा कमी करून धरणाच्या मुख्य भिंतीला आतून ग्राउंटिंग करण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन केले जात आहे.