अलीकडे अचानक का कोसळतोय शेअर मार्केट? हे आहे कारण….

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण पाहायला मिळतेय. खरंतर 1 आठवड्यापूर्वी बाजार झपाट्याने वर जात होते. 16 जानेवारीला आपला 52 आठवड्यांचा उच्चांक गाठणारा सेन्सेक्स आता 350 अंकांनी कोसळला आहे.

निफ्टीचीही हिच अवस्था आहे. मात्र असं का होतंय? याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. याचं उत्तर म्हणजे एफपीआयने पैसे काढणे. परदेशी पोर्टफोलियोच्या गुंतवणूकदारांनी या महिन्यात आतापर्यंत इक्विटी मार्केटमधून 24734 कोटी रुपये काढले आहेत. एफपीआयद्वारे असं केलं जातंय कारण सेबीने एक आदेश दिलाय. पाहूया हा आदेश काय…

सेबीचा हा नवीन नियम 31 जानेवारीपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांना मान्य करणं आवश्यक आहे. हा नियम काय आहे? तर सेबीने म्हटलंय की, एएफपीआयला आता आपल्याविषयी पहिल्यापेक्षा जास्त माहिती द्यावी लागेल. सेबीला वाटतं की, एफपीआयच्या माध्यमातून कोणतीही परदेशी कंपनी बनावट पद्धतीने कोणत्याही भारतीय कंपनीचा मालकी हक्क मिळवता कामा नये.

एफपीआयचे नियम हे एफडीआयसारखे कठोर नाही. याचा फायदा घेऊन अनेकदा परदेशी कंपन्या एफपीआयच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांवर मालकी हक्क घेण्याचा प्रयत्न करतात.सेबीने गेल्या वर्षीच या संबंधित एक नियम जारी केला होता. जो मानन्यासाठी एफपीआयला 90 दिवस दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.

आता हा नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, एफपीआयला त्या कंपन्यांविषयी सविस्तर माहिती द्यावी लागेल जिथे त्यांनी भागीदारी, इकॉनॉमिक इंट्रिस्ट आणि कंट्रोल राइट्स आहेत.सेबी 31 ऑक्टोबर 2023 ला पहिल्यांदा हा नियम घेऊन आले होते आणि एफपीआयला 90 दिवसांचा कालावधी हा नियम मान्य करण्यासाठी दिला होता.

म्हणजेच 29 जानेवारी 2024 पर्यंत ही अट पूर्ण करावी लागेल. खरंतर, जेनुइन एफपीआयला आणखी 30 ट्रेडिंग डेजचा वेळ दिला जाईल. यानंतर जर ते अटी पूर्ण करु शकले नाहीत तर 6 महिन्यात त्यांना आपली भागीदारी भारतीय मार्केटमधून हटवावी लागेल.