महाराष्ट्रातील पारा वाढला, पण अद्यापही थंडी कायम!

महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून थंडीचा कडाका सुरु आहे. मात्र गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त भागांमध्ये थंडीपासून काहीसा दिलासा मिळालाय. राज्यभरातील किमान तापमानात वाढ झालीये.हवामान विभागाचा दावा आहे की, पुढील आठवड्यापर्यंत ही स्थिती कायम राहील. प्रदेशात एकदा पुन्हा फेब्रुवारीच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी पडू शकते. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात किरकोळ चढ-उतार येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने तीव्र थंडी आहे. याचा थोडाफार परिणाम महाराष्ट्रातही जाणवतोय.रविवारी महाराष्ट्रात एक अंकात किमान तापमान कोठेही नोंदवण्यात आलं नाही. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भात रात्रीचं तापमान हे 10 डिग्रीपेक्षा खाली आलं होतं.

भारतीय हवामान विभागानुसार, रविवारी राज्यात जळगाव सर्वात थंड ठिकाणं होतं आणि किमान तापमान कमी होऊन 10.8 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आलं. यानंतर विदर्भाच्या चंद्रपुरात पारा 11 डिग्री सेल्सियपर्यंत खाली आला.

एका हवामान विशेषज्ञाने सांगितलं की, महाराष्ट्रात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नाही तर दोन महिने उशिराने जानेवारीत पारा 10 डिग्री सेल्सियसच्या खाली गेलाय. खरंतर राज्यासाठी अधिकांश हिवाळ्याचं वातावरण संपलं आहे.

महाराष्ट्र सामान्यतः 15 फेब्रुवारीपर्यंत रात्रीचं तापमान कमी दिसून येईल. 15 फेब्रुवारीनंतर वसंत ऋतू सुरु होऊ लागतो. मजबूत पश्चिमी विक्षोभमुळे मध्य फेब्रुवारीनंतरही राज्यात किमान तापमान खाली आल्याने थंडी पडू शकते.