आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना झटका

सांगली जिल्ह्यातील नरवाड या ग्रामपंचायतीनं घेतलेल्या निर्णयाचं संपूर्ण महाराष्टात कौतुक होतंय. पोटच्या गोळ्याकडून आई-वडिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार रोखण्याच्या दृष्टीने नरवाड ग्रामपंचायतीनं एक मोठं पाऊल उचललं आहे.

जी मुलं-मुली आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करणार असल्याचा ठराव, या ग्रामपंचायतीनं एकमतानं मंजूर केलाय.