कोल्हापूरचा पारा ३८ अंशावर…..

मार्च महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात कमालीचा उकाडा पाहायला मिळत आहे. मंगळवारी कमाल तापमान तब्बल 37.7 अंशांवर गेले होते. यामुळे कोल्हापूरकर अक्षरशः घामाघूम झाले होते.उन्हाचा तडाखा वाढल्याने अतिनील किरणांसह उष्माघाताचा धोका वाढला आहे.

दुपारी 1 ते 2 च्या सुमारास काही काळासाठी अल्ट्राव्हायलेट रेज इंडेक्स (यूव्ही इंडेक्स) 12 पर्यंत जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यूव्ही इंडेक्सची ही धोकादायक पातळी समजले जाते.पारा 38 अंशावर गेल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे.

या वाढलेल्या उष्म्यामुळे स्नायूमध्ये गोळे येणे, पोटाच्या स्नायूत मुरडा पडणे, खूप घाम येणे, ताप, नाडीचे ठोके वाढणे अशा समस्या दिसू लागल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.