पत्नीमुळे अनिल कपूर आणि माधुरी यांच्यात आला होता दुरावा…

बॉलिवूडसृष्टीतील अनेक कलाकार आहेत ज्यांच्या लिंकअपची चर्चा ही चांगलीच सुरु असते. त्यातही हे लिंकअप लग्ना आधी नाही तर लग्नानंतर देखील असतात. ज्यामुळे अनेकदा या कलाकारांचं वैवाहिक आयुष्य खराब होतं तर अनेकांचा संसार मोडतो. पण काही कलाकार हे वेळ येताच त्यागोष्टीपासून लांब होतात. असंच काहीसं माधुरी दीक्षितनं अनिल कपूर यांच्यासोबत केलं. जेव्हा त्या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. 

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी ही 1980-90 च्या दशकात सुपरहिट जोडी होती. त्या दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या प्रचंड आवडली होती. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या दोघांनी ‘तेजाब’, ‘बेटा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘खेल’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या होत्या. यावेळी अनिल कपूर हे विवाहीत होते. सेटवर शूटिंग सुरु असताना अनिल कपूर यांची पत्नी सुनीता त्यांच्या मुलांसोबत तिथे पोहोचली होती. 

सेटवर जेव्हा माधुरीनं अनिल कपूर यांच्या कुटुंबाला पाहिलं तेव्हा त्यांनी ठरवलं की पुढे ती अनिल कपूर यांच्यासोबत काम करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल कपूर आणि तिच्या विषयी सुरु असलेल्या अफवांचा परिणाम हा त्यांच्या सुंदर कुटुंबावर होऊ नये. त्यामुळे तिनं अनिल कपूर यांच्यापासून अंतर ठेवले. रिपोर्ट्सनुसार, माधुरीनं एका मुलाखतीत सांगितलं की ज्यामुळे अनिल कपूर यांच्या कुटुंबावर परिणाम होईल असं तिला काहीच करायचं नव्हतं. 

दरम्यान, 1989 मध्ये दिलेल्या मुलाखतीत माधुरीला विचारण्यात आलं होतं की ती अनिल कपूर यांच्याशी लग्न करेल का? यावर उत्तर देत अनिल कपूरसारख्या व्यक्तीशी ती लग्न करू शकत नाही, कारण ते हायपर सेंसिटिव्ह आहेत. माधुरीनं सांगितलं की तिची इच्छा आहे की तिचा नवरा कूल असायला हवा. त्यानंतर माधुरीनं डॉ. नेने यांच्याशी लग्न केले. तर माधूरी आणि अनिल कपूर आजही चांगले मित्र आहेत. अनेक वर्षे त्यांची जोडी आपल्याला ऑनस्क्रिन पाहायला मिळाली नाही, तर 2019 मध्ये त्यांनी ‘टोटल धमाल’ या चित्रपटात एकत्र काम केले. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरला.