पुढील 72 तास महत्वाचे!

राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. बहुतांश शहरांचे कमाल तापमान 39 ते 42 अंशांवर गेले आहे. आगामी 72 तास अवस्थ करणारे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.तसेच, 5 ते 7 एप्रिलदरम्यान पावसाचाही अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागाचे कमाल तापमान गुरुवारी 40 अंंशांवर गेले.

विदर्भातील ब्रह्मपुरी गावचा पारा गुरुवारी राज्यात सर्वाधिक 42.3 अंशांवर गेला होता. दरम्यान, राज्यात 5 ते 7 एप्रिलदरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आल्याने आगामी 72 तास उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. हे वातावरण अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे काळजी घ्या, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.