Ind vs Aus: रोहित शर्माची माघार?, टीम इंडियामध्ये खळबळ; कर्णधारपद कोण सांभाळणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कारणामुळे दोन सामन्यांमधून रोहित शर्मा माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्माने याबाबत बीसीसीआयला कळवल्याचेही सांगण्यात येत आहे. मालिका सुरू होण्याआधी वैयक्तिक बाब निकाली निघाल्यास रोहित शर्मा सर्व सामने खेळू शकेल, असंही बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे.रोहित शर्मा पहिल्या 2 सामन्यांमधून बाहेर पडला तर त्याच्या जागी दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये भारत ब संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन घेऊ शकतो.

ईश्वरन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे.  ईश्वरनने दुलीप ट्रॉफीमध्ये 2 शतकी खेळी खेळली आणि नुकत्याच झालेल्या इराणी चषक 2024 च्या सामन्यातही त्याने 191 धावांची शतकी खेळी खेळली होती. कर्णधारपदाचा विचार केल्यास, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह भारतीय संघाची धुरा सांभाळू शकतो. याआधी देखील जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.