जयंत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांना डिवचलं…..

करवीरच्या जनतेनं कधीही जातीयवादी विचारधारेला थारा दिलेला नाही. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार टिकविण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना ( Shahu Chhatrapati ) दिल्लीला पाठवा.जातीयवादी विचारसरणीच्या थोबाडीत मारण्याची ही संधी आहे. या निवडणुकीतून येथील पुरोगामित्व पुन्हा एकदा सिद्ध करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ( Kolhapur Lok Sabha Constituency ) काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज ( Shahu Chhatrapati ) यांच्या प्रचारार्थ ‘इंडिया’ आघाडी व ‘महाविकास आघाडीच्या’वतीने रविवारी वज्रमूठ सभा महासैनिक दरबार हॉल येथे झाली. तेव्हा जयंत पाटील बोलत होते.