देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.६ जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिसे नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार आहे. तसेच, मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. उमेदवार दिला नाही किंवा कोणाला पाठिंबा दिला नाही. मात्र ६ जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिले तर पुन्हा उपोषण करणार आहे. तसेच, मराठा समाज विधानसभेची तयारी करणार”, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.