दिव्या भारतीच्या मृत्यूचं हे होतं खरं कारण… धक्कादायक खुलासा

 दिव्या भारती ही बॉलीवूडमधील सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक होती. तिने लहान वयातच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि तीन वर्षांतच ती इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री झाली. पण वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला. दिव्याच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना बराच धक्का बसला होता.

यानंतर दिव्याची हत्या करण्यात आली असून कोणीतरी तिला बाल्कनीतून ढकलून दिल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.  दरम्यान आता तिच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी दिव्याचा सह कलाकार अभिनेता कमल सदानाने तिच्या मृत्यूविषयी धक्कादायक खुलासा केल्याचं समोर आलंय. दिव्याच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न पडले होते. ज्याची उत्तरं अद्यापही कोणाला मिळाली नव्हती. त्यामुळे तिच्या मृत्यूविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जातात. तसेच आजही दिव्याच्या मृत्यूबाबत अनेक संभ्रम आहेत, जे अद्यापही दूर झाले नाहीयेत.सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कमल सदानाने यावर भाष्य केलं आहे.

कमल सदाना म्हणाले की, दिव्या भारतीच्या मृत्यूच्या वेळी तिच्याकडे अनेक चित्रपट होते आणि ती एक मोठी स्टार बनू शकली असती. मला असं वाटतं की त्यावेळी तिने खूप ड्रींक केलं असावं. त्यामध्ये तिचा तोल गेला असावा. पण मला असं वाटतं की हा फक्त एक अपघात होता. कारण मी तिच्यासोबत शुटींग करत होतो आणि ती खूप खुश होती.तिच्याकडे चित्रपटांची एक मालिका पूर्ण साईन केली होती. त्यामुळे तिच्याकडे कामही खूप होतं.