धक्कादायक : एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समाेर आहे. हे तिघे देखील एकाच कुटुंबातील असून सुळे गावातील असून गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीसाठी धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले होते. यावेळी तिघांचा बुडुून मृत्यू झाला.

यामध्ये उदय बचाराम कटाळे, अरुण बचाराम कटाळे, प्रकाश अरुण कटाळे यांचा समावेश आहे. ही घटना घडल्यानंतर अनेकांनी नदीकाठी धाव घेतली. काहींनी गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात तिघांना शाेधण्याचा प्रयत्न केला. पाेलिस या घटनेेचा तपास करीत आहेत.