राज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं असून धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन गटांतील वादाचं पर्यवसन चाकू हल्ल्यात झालं आणि त्यात एकाचा मृत्यू झााल. या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच राजकीय वादाचं पर्यवसन एकाची हत्या….
