इचलकरंजीतील पंचगंगा नदीतील पाणी पातळीत वाढ!बंधारा पाण्याखाली

सध्या सगळीकडेच पाऊस आपली हजेरी लावत आहे. काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्यामुळे हवेत गारवा जाणवू लागलेला आहे. खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेला पाऊस हा सगळीकडेच आपली हजेरी लावताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतील बंधारा हा पाण्याखाली गेला असून पाणी पातळीमध्ये वाढ होतानाचे चित्र आपणास पहावयास मिळत आहे. नदीकाठचा घाट परिसर हा हळूहळू पाण्याखाली जात असून इचलकरंजी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा ही सतर्क राहिलेली आहे. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीची इशारा पातळ 68 फूट असून धोका पातळी ही 71 फुटांवर आहे.

आता सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सतरा फूट दहा इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड तर कासारी नदीवरील येवलुज असे सात बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. सात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.