बँकेअभावी रुई ग्रामस्थांची होतेय फरफट…..

रुई येथे राष्ट्रीयकृत किंवा नागरी बँक नसल्यामुळे आर्थिक व्यवहार करताना गावकऱ्यांची फरफट होत आहे. राष्ट्रीयकृत बँकेची शाखा कधी सुरू होणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सुमारे १५ हजार लोकसंख्या आणि १३४२ हेक्टर क्षेत्रफळ असलेले हे गाव पंचगंगा नदीकाठी वसले आहे.

शेती आणि जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात गाव अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. राष्ट्रीयकृत किंवा नागरी बँक नसल्याने उद्योगधंद्याचे व्यवहार करताना अडथळे निर्माण होत असून औद्योगिक आर्थिक व्यवहाराला मर्यादा येत आहेत.