मनोज जरांगे 20 जुलै रोजी आमरण उपोषणला बसणार आहेत. आमरण उपोषणाच्या 17 दिवसानंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा ते करणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे आरक्षणाची मागणी घेऊन 7 ऑगस्ट पासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. सोलापूर पासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यानंतर सांगलीत 8 ऑगस्टला त्यांची तोफ धडाडणार आहे. सांगली बरोबरच कोल्हापूर, सातारा व पुणे येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे.
8 ऑगस्टला मनोज जरांगेंची सांगलीत तोफ धडाडणार!
