पावसामुळे दहावी बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल! आता या तारखेला होणार….

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ जुलै ऑगस्ट महिन्यात घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र, राज्यभरात विविध ठिकाणी अतिवृष्टी होत असल्याने 26 जुलै रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.पावसामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत.

इयत्ता दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाची परीक्षा 26 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत नियोजित करण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. आता या विषयाची परीक्षा 31 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत घेतली जाणार आहे.