मोठी बातमी! 5 दिवसांत उजनी धरण शंभरी गाठणार; सोलापूरला मोठा दिलासा

 सोलापूर आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्वाचे असणारे उजनी धरण (Ujani Dam) अखेर प्लसमध्ये आले आहे. आज सकाळी 9 वाजता धरणाने शू्न्य पातळी ओलांडली आहे. ऐतिहासिक नीचांकी पातळीनंतर केवळ 54 दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आले आहे. गेल्या 54 दिवसात धरणात तब्बल 33 टीएमसी पाणी आले आहे. असाच पाऊस सुरु राहिल्यास धरण पुढील 5 दिवसात 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा मायनसमधून प्लसमध्ये गेलं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळं तेथील धरणासाठ्यात मोठी वाढ झालीय. त्यामुळं पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.