राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, यापुढे हवामान कसं राहणार आहे. कुठं कुठं पाऊस पडणार आहे?
याबाबतची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे. पुढील चार दिवस म्हणजे 28 ते 31 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 15 जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी आहे. केवळ मध्यमच पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. 1 ऑगस्टपासून या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याचे ते म्हणाले.