मोठी बातमी! भाजप आमदाराचा राजीनामा, हरिभाऊ नानांच्या जागी कोण?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जुलै रोजी देशात अनेक राज्यपालांची नियुक्ती केली. त्यातील काही नेते महाराष्ट्रातील आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे, भाजपची विधानसभा सदस्यांची संख्या एकाने कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत खासदार बनलेल्या 8 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

त्यानंतर, लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. आता, हरिभाऊ बागडे यांनाही मोठी संधी मिळाल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.अनेक राज्यपालांची नियुक्ती केली. त्यातील काही नेते महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ किसनराव बागडे. हरिभाऊ यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, भाजपने हरिभाऊ बागडेंना मोठी संधी दिली असून थेट राज्यपालपदाची जबाबदारी आता त्यांच्यावर देण्यात आली आहे.

हरिभाऊ बागडे यांच्या राजीनामामुळे आता, फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून अनुराध चव्हण, राधाकिसन पठाडे, सुहास सिरसाट, विजय औताडे, रामभाऊ शेळके, राजेंद्र साबळे, प्रदीप पाटील आणि दामुअण्णा नवपुते ही नावे इच्छुक आहेत.दरम्यान, हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे 45 वे राज्यपाल बनले आहेत. राज्याचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्रा यांचा कार्यकाळ २१ जुलै रोजी पूर्ण झाला. लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार असून आज त्यांनी महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.