आता चोऱ्यांची टोळी खानापूर तालुक्यात……

पलूस तालुक्यातील अनेक भागांमध्ये चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. या चोरट्यामुळे स्वरक्षणासाठी गावातील तरुण ग्रामस्थ यांनी गट बनवून गावात रात्रभर गस्त घालायला सुरुवात देखील केलेली आहे. आता चोरांच टोळक खानापुरात आलेला आहे म्हणजेच खानापुरात भांडी विकण्याच्या उद्देशाने अनेक स्त्रिया फिरत आहेत. या स्त्रिया गावातून संशयितरित्या फिरत असलेल्या पाहायला मिळत आहेत. गावकऱ्यांनी त्यांना विचारले असता त्या त्यांनाच गुरगुरूत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे या स्त्रियांवर लक्ष ठेवावे अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे.

पलूस तालुक्यातील धनगाव, भिलवडी, भुवनेश्वरवाडी, चोपडेवाडी, औदुंबर, अंकलखोप, खंडोबाची वाडी, अमनापुर बोरजाईनगर, जुळेवाडी, हजारवाडी, बांबवडे, येळावी, विठ्ठलवाडी तुरची या गावात सध्या चोरट्यांच्या भीतीने गस्त घालण्याचे काम सुरू आहे. या भागांमध्ये एक संशयितरित्या महिला आढळली होती तिची कसून चौकशी केली असता त्या महिलेपाशी एक बॅग सापडली आणि त्या बॅगमध्ये चोरी करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य सापडले होते.