उसात पावसाचे पाणी साचल्याने उत्पन्नघटीचा धोका

शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत सातत्याने पाऊस होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पूर येऊन गेल्यानंतर केवळ दहा ते बारा दिवस पावसाची उघडीप राहिली. यानंतर पुन्हा पावसास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी वाफसा येण्याआधीच पुन्हा शेतामध्ये पाण्याचे तळे झाले. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी हंगामात चांगला पाऊस झाला. परिणामी, गेल्या दीड महिन्यापासून ऊस शेतीत सरीच्या सरी भरून पाणी तुंबून राहिले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले तरी जमिनीतून पाण्याचा उमाळा सुरूच आहे. माळ भागातील शेती वगळता अन्य भागात सततच्या पावसामुळे ऊस शेतीत पावसाचे पाणी साचल्याने उसाची वाढ खुंटली आहे. उसाला अन्नद्रव्य मिळवून देणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ थांबल्याने परिणामी उसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे.
पाणी साचून राहिलेल्या उसाचे वजन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष करून