३० सप्टेंबरला इस्लामपुरात इनाम जमीन प्रश्नी मोर्चा

इस्लामपूर देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात या मागण्यांसाठी ३० सप्टेंबर रोजी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय इस्लामपूर येथील मेळाव्यात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी रेठरे साखर कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव सावंत होते. प्रमुख मार्गदर्शक किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी उमेश देशमुख म्हणाले, महसूल प्रशासनाने इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाचा कोणताही आदेश नसताना ७/१२ पत्रकावरील नावे कमी करून शेतकऱ्यांना कागदोपत्री उपरे करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी वसंतराव पाटील, शंकरराव साळुंखे, राजमाने उपस्थित होते.