पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झालीये. त्यामुळे आवक घटली असताना आठवडेबाजारात तरकारी मालासह भाजीपाल्याचा भाव चांगलाच वाढला आहे.गणेशोत्सव संपताच पितृ पक्षाला सुरुवात झाली. पितृ पक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी आख्यायीकेनुसार विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. त्यात एक मिश्र भाजी ही अगत्याने असतेच. मात्र यंदा पावसाच्या अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेय. विविध भाज्यांची बाजारात आवक घटली आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टीने आणि तिप्पटीने वाढून गगणालाच भिडले आहेत. यात भाज्यांची चव वाढविणारी कोथींबीर आणि मेथीही महागली आहे.
Related Posts
शेअर बाजार विक्रमी पातळीवर बंद! सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला नवा उच्चांक…..
आज शेअर बाजार नव्या विक्रमावर बंद झाला. दोन्ही बाजार निर्देशांकात वाढ झाली आहे. आज सेन्सेक्स 847.27 अंकांच्या किंवा 1.18 टक्क्यांच्या…
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट! पुढील 24 तासांत वरुणराजा बरसणार
एकीकडे उत्तर भारतात हाड गोठवणारी थंडी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर भारतात थंडीचा गारठा…
मुंबईत मराठा माणसांच्या हक्कावर गदा आणली जाते..
देशाची आर्थिक अन् महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे हे प्रकार असताना…