रेल्वे विभागाची सांगोल्यात अशोक कामटे संघटनेसमवेत बैठक संपन्न

सांगोल्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर भर असल्याचे प्रतिपादन शहीद अशोक कामटे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नीलकंठ शिंदे सर यांनी रेल्वे प्रश्नांच्या आढावा बैठकीत व्यक्त केले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने प्रवाशांच्या व नागरिकांच्या समस्या संदर्भात सोलापूर येथील विभागीय रेल्वे कार्यालयास निवेदन देण्यात आले होते.

सदर तक्रार व निवेदनाची दखल घेऊन या मध्य रेल्वे विभागातील कार्यालयातील संबंधित अधिकारी, पंढरपूर येथील अभियंता महादेव बांग (इंजिनिअरिंग), आरपीएफ व जीआरपीएफ पोलीस दल कुईवाडी लोहमार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर देसाई यांनी समस्या संदर्भात संघटनेच्या कार्यालयात मीटिंग घेऊन सर्व समस्या व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर सांगोल्यातून थेट मुंबईकरिता रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांच्यामार्फत दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा सुरू असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

कोल्हापूर- कलबुर्गी- कोल्हापूर थांबा डिसेंबरमध्ये अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले त्याकरिताचा अहवाल देखील सोलापूर येथील रेल्वे विभागाने सकारात्मक महा व्यवस्थापक कार्यालय मुंबई यांना पाठवल्याचे यावेळी सांगितले. त्याचबरोबर मिरज रेल्वे गेट भुयारी मार्गात पाणी साठत असल्याने सदरचा प्रश्न नगरपालिका सांगोला व रेल्वे विभाग यांच्या समन्वयाने कार्यवाही करून सोडविणार आहेत अशी माहिती रेल्वे विभागाचे अभियंता महादेव भांगे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला. आवश्यकता भासली तर वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत लवकरच अशोक कामटे संघटनेची बैठक लावणार असल्याचे आरपीएफ पोलीस निरीक्षक सुहास जाधव यांनी सांगितले. त्याचबरोबर सांगोल्यातील रेल्वे विभागाचे समस्या वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयास कळवून प्राधान्याने शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी शहीद कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मीटिंग वेळेस उपस्थित होते.