जिल्ह्यात नवरात्रोत्सवासह यात्रा, सण उत्सव साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी उपोषण, मोर्चा आदी आंदोलने सुरू आहेत.यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून ते १३ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला.
हा आदेश कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना लागू नाही. कारण त्यांना कर्तव्य बजावताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते. तसेच ज्या व्यक्तींनी पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना, लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही, असे या आदेशात नमूद केले आहे.