ॲड. वैभव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश! नवीन डीपी मंजूर

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पोसेवाडी येथे भगीरथ योजनेचा डीपी बसविण्यात आलेला आहे. अनेक वर्षांपासून गावात लाईटमुळे पाणीपुरवठ्यात सतत अडथळा निर्माण होत होता. ही बाब ॲड. वैभव पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना भगीरथ योजनेत घालून नवीन डीपी मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे आता पोसेवाडी गावातील पाणीपुरवठा 24 तास सुरू झालेला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना सुद्धा याचा लाभ झालेला आहे.