कृष्णा योजनेला गळती : पाणीपुरवठा विस्कळीत होणार

इचलकरंजी, शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणारी जुनी पाण्याच्या दाबनलिकेस गुरुवार दि. २९ मे रोजी शिरढोण गावानजिक पाईपलाईला गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहरास होत असलेला पाणी पुरवठा तातडीने बंद करणेत आलेला आहे.

 सदर ठिकाणची गळती काढणेचे काम महानगरपालिकेच्या वतीने तातडीने हाती घेणेत आल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार असल्याने शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.सदर पाइपलाईनची गळती काढणेचे काम पूर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणीसाठा जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे.