भारतात एकूण लोकसंख्येच्या एकूण ५० टक्क्यांहून अधिक नागरिक शेती आणि शेतीसंबंधित व्यवसाय करतात. शेती करुन आपला उदरनिर्वाह करणारे असंख्य शेतकरी देशात आहेत. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनातून फारसा फायदा होत नाही.काहींना तर आपली उपजिवीका करणे शक्य होत नाही. अशा आर्थिकदृष्ट्या गरजू शेतकऱ्यांसाठी शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरु केली आहे.फेब्रुवारी २०१९ पासून ते आतापर्यंत सरकारने १८ हफ्त्यांमध्ये पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. आता शेतकऱ्यांना १९ व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये शेवटचा (अठरावा हफ्ता) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला होता. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये १९ व्या हफ्त्यांअंतर्गत दोन हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना नववर्षाचं मोठं गिफ्ट, किसान योजनेचा पुढील हप्ता ‘या’ दिवशी मिळणार
