प्रत्येक भागात अनेक कोणत्या ना कोणत्या कारणामधून वैर हे असतेच. तसेच प्रत्येक भागात गुन्हेगारी देखील पहायला मिळतेच. प्रत्येक जिल्ह्यातून अनेकांना काही कालावधीसाठी हद्दपार देखील केलेले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असतानाही आदेशाचा भंग करून इचलकरंजीत वावर करणाऱ्या चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पो.ना.अरविंद माने यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. २ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री माणकापूर येथील एस कॉर्नर चौकात राकेश कुंभार याचा अपघात झाला.
त्याला अलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ९.४५ च्या सुमारास आरोपी संजय शंकरराव तेलनाडे (वय ४४, रा. त्रिशूल चौक), दिपक सतीश कोरे (वय ३४, रा. राणाप्रताप चौक), इमरान दस्तगीर कलावंत (वय ३२, रा. गावभाग), आणि अभिजीत सुभाष जामदार (वय ३८, रा. जामदार वाडा, गावभाग) हे आले होते,सदर चौघे ७ जून पासून कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यानी अलायन्स हॉस्पिटलचे सिसिटीव्ही फुटेज चेक करून त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास पो.नि.सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. साने करत आहेत.