सांगोलकरांच्या प्रेमाच्या ऋणात राहीन; पालकमंत्री जयकुमार गोरे

सांगोला येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. येथे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मी येण्यापूर्वी सांगोल्यात भूकंप झाला असे समजलं. परंतु सर्व पक्षीय नेते एका स्टेजवर आले यामुळेच भूकंप झाला असावा असं वाटतं. सांगोलकरांचं व आयोजकांचं ऋण व्यक्त करतो. ज्याप्रमाणे तुम्ही स्वागत केलं मला असं वाटलं की मी सांगोल्यात नाही आमच्याच तालुक्यात आहे. मी माण खटावचं नाही तर सांगोलकरच आहे असं सांगोलकरांनी समजलं याचा आनंद मनापासून आहे. हे फक्त सांगोल्यात घडू शकत. व्यासपीठावर बसलेल्या सर्वच मान्यवरांना आमदार होण्याची इच्छा आहे.

यामध्ये आता पुन्हा शहाजीबापू पाटील, दीपकआबा साळुंखे पाटील, डॉक्टर अनिकेत देशमुख, चेतनसिंह केदार, आणि जर महिला आरक्षण पडलं तर राजश्रीताई नागणे पाटील यांचाही समावेश असेल यामध्ये काही गैर नाही. परंतु सांगोल्याची राजकीय संस्कृती वेगळी आहे याचे इतर ठिकाणी अवलोकन होणे गरजेचे आहे. असे सांगत, जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत जे लागतं खासदार केले याची उतराई केली. फक्त भाषण करून पाणी येत नाही. बिन पाण्याच्या विहरीत उडी मारण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या पाण्याच्या विहिरीत उडी मारा असा सल्ला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना दिला.

तसेच तालुक्याच्या प्रश्नासाठी कोणी जरी आलं तरी जयकुमार गोरे कधीही कमी पडणार नाही. ती माझी जबाबदारी आहे. पाण्याचा संघर्ष जयकुमार गोरे यांनी बघितला आहे. पाणी ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी दिले पाहिजे ही भूमिका माझी आहे. फक्त पाणी ओढयान नाल्याने सोडू नका. पाण्याचा वापर नीट करा ठिबक चा वापर करा. असे त्यांनी सांगितले. यासह राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून आलो ते फक्त भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्या मुळे आलो आहे. सामान्य कुटुंबातून आलो आणि मंत्री झालो.

सांगोला तालुक्याला जे पाणी मिळाले त्या पाण्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे. हे दोघे नसते तर पाण्याच्या योजना पूर्णत्वाला आल्या नसत्या हे ठामपणे मी सांगतो. दरम्यान रक्ताचं पाठ वाहतील पण सांगोल्याच्या पाण्याला हात लावू देणार नाही असे मी सांगितले होते.