धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं, आज इथली लोक.., लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान

धनंजय मुंडे(politics) यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं. त्यांचा आज इथली लोक सत्कार करत आहे ही जन भावना आहे. ज्याने ज्याने जातिवाद केला राजकीय भावनेतून त्यांनीच बीड जिल्ह्याची बदनामी केली. अशी टीका देखील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. बीड शिरुर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताह प्रसंगी उपस्थित झाले असता माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात कित्येक दिवसापासून बीड चे हे वेगळं रूप आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे मीडिया ट्रायलच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी होत्या.आज हा भक्तीचा जनसागर बघितल्यानंतर खरं तर हा बीड जिल्हा हा विचार ही माणसं महाराष्ट्राचा (politics)पटलावर पुढे गेली पाहिजेत असं मला वाटतं.

बीड जिल्ह्यात हे अध्यात्म स्वरूपही महाराष्ट्राला दाखवा.ही जनभावना आहे ही समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्राला सुद्धा कळली पाहिजे. ज्याने ज्याने जातिवाद केला राजकीय भावनेतून त्यांनीच बीड जिल्ह्याची बदनामी केली.बीड जिल्ह्याचे भक्तिमय स्वरूप महाराष्ट्राला कळू द्या.

बीड जिल्ह्याच्या बदनामीवर बोलताना ते म्हणाले की, बीड जिल्ह्याची तुलना बिहारबरोबर केली गेली. बीड म्हणजे गुन्हेगारी असे जे समीकरण आहे. या समीकरणाला लाखो लोकांनी इथे आपल्या उपस्थितीमधून आपल्या आचरणातून दाखवून दिलेले आहे. त्यामुळे कृपया महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा.