हातकणंगले, कोल्हापूर, सांगलीसह सहा जागा लढवणार! राजू शेट्टी

आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींचाही खूप वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे आम्ही लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये फारसे लक्ष दिलेले नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आमची एकला चलो रे ची भूमिका राहणार असून हातकणंगले कोल्हापूर सांगली माढा बुलढाणा आणि परभणी या सहा लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू तथा देवाप्पा शेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी राजू शक्ती म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही आघाडी मधून बाहेर पडलो मात्र आम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही बाहेर का पडला याची साधी विचारनाही कोणी केली नाही.

आघाडीच्या नेत्यांकडून आमच्याशी कोणत्याही संपर्क साधला गेला नाही. महाविकास आघाडीच्या काही धोरणांवर आक्षेप घेत आम्ही आघाडीतून बाहेर पडलो. मात्र आम्हाला त्याचे उत्तर मिळाले नाही.

त्यामुळे पुन्हा तिथे जायचेच कशाला आणि त्याचा काहीही उपयोग नाही असे सांगून राजू शेट्टी यांनी आम्ही एकला चलो रे ची भूमिका घेऊन हातकनंगले कोल्हापूर सांगली सह सहा जागांवर मोठ्या ताकतीने लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.