सरकारी नोकरीच्या शोधात आहात? थेट UPSC मध्ये करा अर्ज; मिळवा नियुक्त होण्याची संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! तुमच्या शोधला आता विराम लागणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर आता त्या शोधला राम-राम करा, कारण UPSC ने भरतीला सुरुवात केली आहे. UPSC च्या या भरतीच्या माध्यमातून अनेकांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ४६२ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक, उपअधीक्षक, बागायतशास्त्रज्ञ, विशेषज्ञ, उपकेंद्रीय गुप्तचर अधिकारी, शास्त्रज्ञ ‘ब’, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ इत्यादी पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात अनुभव असेल तर अतिउत्तम आणि नसेल तरी उत्तम! या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवार काही निकषांना पात्र हवा.

हे निकष शैक्षणिक आहेत तर उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीबीएस किंवा पदानुसार संबंधित पात्रता आवश्यक ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. तसेच आयुमर्यादाही पदानुसार ठरवण्यात आली आहे. मुख्य म्हणजे अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 वर्षे सूट निश्चित करण्यात आली आहे. OBC प्रवर्गासाठी ३ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे.

निवड प्रक्रियेत उमेदवारांना लेखी परीक्षा पात्र करावी लागेल. तसेच मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. दोन्ही टप्प्यात पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. जर तुम्ही सामान्य किंवा OBC प्रवर्गातून असाल तर अर्ज शुल्क म्हणून तुमच्याकडून २५ रुपये आकारण्यात येईल. तर इतर उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. उमेदवारांना ३ जुलैपर्यंत अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी UPSC ची upsc.gov.in ही वेबसाईट लक्षात घ्यावी. येथे जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेत तसेच मदत घेत दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर नक्कीच UPSC च्या या नोकरीचा फायदा घ्या आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या. भरतीला सुरुवात झाली असून अनेक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरु केली आहे.