संपूर्ण राज्यासाठी अत्यंत अध्यात्मिक मानल्या जाणाऱ्या आषाढी वारीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटण्याचा प्रकार घडला आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचीही संतापजनक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी पंढरपूर (Pandharpur) कडे जाताना वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले आणि त्यांना अडवलं. दोन जणांनी कोयता गळ्याला लावला आणि त्यांना लुटलं. त्यानंतर या आरोपींनी अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचाही आरोप आहे.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.माहितीनुसार, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना वारकरी वाटेत चहापाण्यासाठी थांबले होते. चहापाणी झाल्यानंतर गाडीत बसताना दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले. त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. त्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर घेऊन गेले आणि तिच्यावर त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे.