दीर्घ उपवासानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळाव्यात

लवकरच आता नवरात्र सुरु होणार आहे. ज्यामध्ये लोक संपूर्ण 9 दिवसांचा उपवास करतात. कोणताही व्रत केल्यानंतर त्याच्या पारणाला विशेष महत्त्व आहे म्हणजे उपवास सोडण्याच्या विधिला. पण कोणत्याही व्रताच्या पारणावेळी अन्नाची विशेष काळजी घेणे फार आवश्यक असते. म्हणजे तु्म्ही उपवास सोडताना कोणतं अन्न ग्रहण करता हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण जास्त दिवस उपवास केल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे उपवास सोडताना पदार्थांच्या निवडीमध्ये चूक झाली तर त्या निष्काळजीपणामुळे पचन बिघडण्याची तसेच आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, उपवासाच्या पारणानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेऊयात.

तिखट आणि मसालेदार पदार्थ

उपवास सोडल्यानंतर, कधीही मसालेदार आणि तिखट पदार्थ खाऊ नयेत. दीर्घ उपवासानंतर आतड्यांचे अस्तर खूप मऊ होते. अशा परिस्थितीत, मिरचीचा तिखटपणा अन्ननलिकेतून आतड्यांचे अस्तर जाळतो. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

आंबट पदार्थ

उपवास सोडल्यानंतर दही, ताक, लिंबू यांसारखे आंबट पदार्थ टाळावेत. आंबट पदार्थांमध्ये आम्लयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असते जे आतड्यांच्या अस्तरांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि दीर्घकाळात छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.

जड धान्याचे पीठ, जसे की बेसन

अशा पदार्थांमुळे बद्धकोष्ठता होते आणि ते पचण्यास कठीण असतात. उपवास संपल्यानंतर या पिठाचे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. बेसन खाल्ल्याने पोटात बद्धकोष्ठता होते. आणि त्याचे पचन देखील लगेच होत नाही.

गोड आणि साखरयुक्त पदार्थ

उपवास सोडल्यानंतर, तुम्ही घन गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे. जर तुम्हाला गोड पदार्थ खायचे असतील तर द्रव गोड पदार्थ प्या. यामुळे शरीराला आराम मिळेल. परंतु जड गोड खाल्ल्याने पदार्थांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

थंड पदार्थही खाणे टाळा

उपवासानंतर, थंड पदार्थ आणि द्रवपदार्थ जसे की थंड भात खाणे देखील टाळावे

किती दिवस सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ?

जर तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस सतत उपवास करत असाल तर किमान चार ते पाच दिवस खाण्याच्या या नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीर आणि पचनसंस्था पूर्णपणे स्थिर होईल. एक दिवस उपवास करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतर देखील खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आरोग्य बिघडू नये.

कोणते पदार्थ खावेत ?

उपवास सोडल्यानंतर, नेहमी सहज पचणारे अन्न खावे. त्याचप्रमाणे, द्रव गोड पदार्थ प्यायले तरी चालते. यामुळे तुमच्या पचनाला त्रास होण्याऐवजी आतड्यांमध्ये अन्न पचण्यास मदत होईल.