लिपिक टंकलेखन भरतीत ढिसाळपणा, विद्यार्थ्यांना मोठा फटका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखक पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून भरती प्रक्रियेत अडकलेल्या ११८ उमेदवारांपैकी केवळ २० जणांनाच नियुक्ती मिळाली असून, उर्वरित ९८ उमेदवार अजूनही नियुक्तीची वाट पाहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. उर्वरित ९८ उमेदवार आजही आपल्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे एमपीएससीच्या ढिसाळ कारभाराला विद्यार्थ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे.

एमपीएससीतर्फे जानेवारी २०२३ मध्ये लिपिक-टंकलेखक पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा झाली व जुलै २०२४ मध्ये कौशल्य चाचणी काही तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणामध्ये खटला दाखल केला. नागपूर निकालानंतर २०२५ मध्ये अंतिम निवड यादी तयार झाली आणि २ सप्टेंबर २०२५ ला कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. आजमितीला २० दिवसांचा कालावधी लोटला, परंतु अजूनपर्यंत नियुक्तीपत्रे देण्यात आली नाहीत.

त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा, डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा आणि जुलै २०२४ मध्ये कौशल्य चाचणी घेण्यात आली. कौशल्य चाचणीतील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) खटला दाखल केला. मॅटच्या निकालानंतर जुलै २०२५ मध्ये अंतिम निवड यादी जाहीर झाली आणि उमेदवारांना नियुक्तिपत्रेही देण्यात आली.

यामध्ये ११८ उमेदवारांना धर्मादाय आयुक्त, मुंबई हा विभाग मिळाला. परंतु, नियुक्तिपत्रे हातात असूनही त्यांना कामावर रुजू करून घेतले जात नाही. विशेष म्हणजे, ज्या २० उमेदवारांची कागदपत्रे २९ तारखेला तपासण्यात आली, त्यांना ३१ तारखेला तातडीने नियुक्ती देण्यात आली, तर उर्वरित ९८ उमेदवारांना मात्र नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.