SSC HSC Exam : कॉपी बहाद्दरांना घडणार अद्दल, दहावी – बारावी परीक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय

ऐन निवडणुकीच्या काळात दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि बोर्ड दोघेही कामाला लागले असून मोठा निर्णय घेतला आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील कॉपीला आळा घालण्यासाठी बोर्डानं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय.दहावी – बारावीच्या परीक्षातील गैरप्रकार रोखण्यासाठी आता बोर्डाने थेट सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान मोबाईलद्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपरफुटी रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत. त्यामुळे
वर्गातील गैरप्रकार रोखण्यासाठी दहावी-बारावीच्या परीक्षेचे आता सीसीटीव्हीत रेकॉर्डिंग होणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्ड प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर बंधनकारक आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असणारे सगळे फुटेज देखील प्रशासनाकडे द्यावे लागणार आहे.

राज्यभरातील सुमारे 4500 केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.अनेक उपाययोजना करूनही परीक्षांच्या काळात कॉपी झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. त्यामुळे बोर्डाने आता सीसीटीव्ही कॅमेराच्या देखरेखीखाली परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. तसेच ज्या केंद्रावर कॅमेरा लावण्यात आले तिथे लाइट गेली तर जनरेटरची सोय करायला सांगितले आहे. तसेच सीसीटीव्हीचे फुटेज निकाल संपेपर्यंत केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे.

केंद्रावरील गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोर्डाकडून त्याची पडताळणी होईल आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक करण्यात आले आहेत. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे असून चालणार नाही, तर त्याचे फुटेज साठवून ठेवण्याचीही सोय आवश्यक आहे. परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत ते फुटेज संबंधित केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे.