भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार! टी-२० वर्ल्डकपची अखेर ठरली तारीख

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरलेल्या टीम इंडियापुढे आता नवी संधी चालून आली आहे. कारण, आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची तारीख जवळपास निश्चित झाली आहे.सूत्रांच्या हवाल्याने टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं असून भारत पाकिस्तान सामन्याची वेळ देखील ठरली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा जूनमध्ये होईल. या स्पर्धेचं यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडे देण्यात आलं आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लडविरुद्ध होईल. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध ९ जूनला खेळवला जाईल. तर तिसरा सामना १२ जूनला अमेरिकेविरुद्ध होईल