टीम इंडियाला ऐतिहासिक विजयानंतर मोठा झटका!

 टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडिया यासह न्यूलँड्स केपटाऊनमध्ये विजय मिळवणारी पहिली आशियाई टीम ठरली. या विजयानंतर टीम इंडियाला 24 तासांच्या आत मोठा झटका लागला आहे. आयसीसीने टीम इंडियासाठी वाईट बातमी दिली आहे.

आयसीसीने टेस्ट टीम रॅकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठं नुकसान झालं आहे. टीम इंडियाने सिहांसन गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मागे टाकत पुन्हा एकदा नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला सलग 2 विजयांचा फायदा हा नंबर 1 होण्यात झाला आहे. तर टीम इंडियाला दुसरा सामना जिंकूनही अव्वल स्थान कायम राखता आलं नाही