सरकारच्या ‘या’ सरकारी योजनेत मिळतात पैसे! फक्त आवश्यक असते आधारकार्ड……

सरकारच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये काही योजना या व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत करतात. तर काही कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत.

परंतु सरकारच्या अशा काही योजना देखील आहेत ज्यामधून आपल्याला पैसे मिळू शकतात. तसे पाहायला गेले तर सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. परंतु बऱ्याचदा आपल्याला पुरेशा योजनांची माहिती होत नाही व काही मोजक्या योजना आपल्याला माहिती असतात.

परंतु काही योजनांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची रक्कम देखील मिळते. एवढेच नाही तर यामध्ये काही सुविधा देखील मोफत दिल्या जातात. त्यामुळे या लेखामध्ये आपण सरकारच्या अशा कोणत्या प्रमुख योजना आहे ज्यातून आपल्याला लाखो रुपये मिळू शकतात? त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

ईश्रमकार्ड योजना

ई श्रम कार्ड योजना योग्य प्रकारे राबवता यावी याकरिता सरकारने ई श्रम पोर्टल देखील सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी नोंदणी केली असून यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार या पोर्टलच्या माध्यमातून 15% महिला व 47 टक्के पुरुषांनी नोंदणी केलेली आहे.या योजनेच्या माध्यमातून ई श्रम कार्ड बनवलेल्या कामगारांना केंद्राने राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते.

या योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांना वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शनची रक्कम मिळते व एवढेच नाही तर नोंदणीकृत कामगाराला दोन लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा संरक्षण देखील या माध्यमातून मिळते. एखादा कामगार जर अपंग झाला तर त्याला एक लाख रुपये दिले जातात.तसेच या अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना घर बांधण्याकरिता निधी दिला जातो.

तसेच या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या कामगारांना त्यांच्या कामानुसार लागणारी उपकरणे देखील दिली जातात. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या श्रमयोगी मानधन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना इत्यादी योजनांचा देखील लाभ दिला जातो.

पीएम सुरक्षा विमा योजना

ही योजना गरीब लोकांसाठी खूप महत्त्वाचे असून योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला वर्षाला फक्त 12 रुपये यामध्ये गुंतवावे लागतात. त्यानंतर मात्र तुम्ही दोन लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी पात्र होता.

तसेच या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक फायदे देखील अर्जदाराला मिळत असतात.पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर जर एखाद्याचा गंभीर अपघात किंवा अपघातात मृत्यू झाला तर या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील मिळते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर वर्षाला फक्त बारा रुपये यामध्ये तुम्हाला जमा करावे लागतात.18 ते 70 वर्षाच्या वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याचा अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आले तर विमाधारकाला दोन लाख रुपये देण्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे.

अंशत: अपंगत्व आले असेल तर एक लाख रुपयांची रक्कम या माध्यमातून मिळते. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बचत खात्याचा तपशील देणे गरजेचे असते व त्या नंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून एक रुपये प्रीमियम कापला जातो.