कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोंधळ!

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी इथं भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने कार्यक्रमात गोंधळ उडाला आहे.

या कार्यक्रमांमध्ये भारतीय ध्वजाला आणि भारत मातेला स्थान न देता केवळ जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी अडवलं. भारतीय ध्वजारोहण कार्यक्रमात भगवे झेंडे आणि एका विशिष्ट पक्षाचा जयघोष केल्याने गोंधळ झाला. तहसीलदार, पोलीस प्रशासनासमोरच हा गोंधळ उडाला आहे.